ताज्या बातम्या

जळगावात आगीच्या भीतीने प्रवाशांनी एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; पण समोरून येणाऱ्या एक्प्रेसने अनेकांना चिरडले

जळगावात आगीच्या भीतीने प्रवाशांनी एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; पण समोरून येणाऱ्या एक्प्रेसने अनेकांना चिरडले

जळगाव टाइम्स प्रतिनिधी। २२ जानेवारी २०२५ । जळगावमध्ये एक भयंकर घटना घडली. ज्यामध्ये आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उद्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं असून या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ हा अपघात आज बुधवारी दुपारी घडला. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने परधाडे रेल्वे स्थानकाजवळ अचानक ब्रेक लावला. यामुळे एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे भयभीत झालेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. पण त्याचवेळी समोरून येणाऱ्या नवी दिल्ली येथून बंगळुरूकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती आहे.

या घटनेत ८ ते १० जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जळगावच्या खासदार स्मिता ताई वाघ या घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात झाल्याचं काही लोक सांगत आहेत. अजून या घटनेची माहिती यायची बाकी आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button