बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस यांना पाळधी येथे जयंतीनिमित्त अभिवादन!
बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस यांना पाळधी येथे जयंतीनिमित्त अभिवादन!

जळगाव टाइम्स प्रतिनिधी| पाळधी : “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले हिंदुत्वाचे आणि सामाजिक न्यायाचे विचार हे प्रत्येक शिवसैनिकासाठी प्रेरणेचा स्रोत आहेत. त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी दिलेले बलिदान आणि योगदान नव्या पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. “बाळासाहेबांच्या नेतृत्वाची ज्योत आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीचा आदर्श शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे प्रतिादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी केले.. पाळधी येथे शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोकुळ पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन युवा सेनेचे तालुकाप्रमुख आबा माळी यांनी केले. सुरुवातीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांना प्रताप पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीकृष्ण साळुंखे, ज्ञानेश्वर पाटील, माळी समाज जिल्हाप्रमुख अनिल माळी, माजी सरपंच अरुण पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य मच्छिंद्र साळुंखे, कैलास इंगळे, अनिल सोनवणे, गणेश माळी, युवा सेनेचे आबा माळी, भूषण पाटील, पीयूष पाटील, शुभम पाटील, चंदू पाटील, योगेश पाटील, महेश पाटील, गोकुळ पाटील, शिवाजी पाटील, म ाजी सभापती अनिल पाटील, बलराम कोळी आणि भरत पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.